पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ‘कॅश कमिटी’ म्हणजेच ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची स्थापना करण्याचा नियम सरकारने केला. दोन वर्षापूर्वी तथापिने पुणे आणि परिसारात केलेल्या पाहणीनुसार अनेक संस्थांमध्ये कॅश कमिटीची स्थापनाच केली नव्हती. ज्या ठिकाणी समिती स्थापन केली होती ती कार्यरत नव्हती.
तथापिच्या पुढाकाराने सुरु झालेल्या आयसोच प्रकल्पाद्वारे विविध संस्था आणि महाविद्यालयांमध्ये ‘कॅश कमिटी’ (अंतर्गत तक्रार निवारण समिती) स्थापन करण्यासाठी आणि अस्तित्वात असलेल्या समित्यांना मजबूत करण्यासाठी काही संसाधनांची निर्मिती केली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३, कॅश समितीची स्थापना, कामकाज याविषयी माहिती देणारा ‘तथापि’च्या पुढाकाराने ‘आयसोच’ प्रस्तुत हा व्हीडीओ अवश्य पहा.
2 Responses
मी एका मुलासोबत 7 वर्ष relation मध्ये होते आधी खूप loyal होता तो आमच्या दोघांच्याही जात different असल्यामुळे त्याने लग्न न करण्यास अचानक कारण पुढे केले त्यानंतर त्याने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या एका महिलेशी संबंध ठेवले माझी फसवणूक केली या नात्यातून बाहेर पडताना मला खूप त्रास झाला
आणी त्याचाच जवळचा मित्राला मी आधीपासून आवडत होते तसे त्याने मला खूप वेळेस सांगितले होते आणि आमची जात एक असल्यामुळेच लग्नाची मागणी घालायचा तो तसे त्याने त्याच्या घरी सांगितले होते. मागील 3 महिन्यापासून आम्ही बोलत आहोत आणि 3 4 वेळेस आमच्यात सेक्स ही झाला. तो कायम मला प्रेम आहे असे सांगायचा
पण आता त्याने अचानक पणे मला सगळीकडे ब्लाॅक करून काहीच कारण नसताना contact बंद केला. तो आमच्या भागातील एक प्रसिद्ध राजकारणी आहे . त्याच्या अशा वागण्याने मला प्रचंड मानसिक त्रास होतोय काय करावे समजत नाही त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच reply मिळत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत आहेत